Posts

पुस्तके तर आज सगळेच वाचतात तुम्हाला वाचायचेच आहे तर कधी तरी हे सुदधा वाचुन बघा

पुस्तके तर आज सगळेच वाचतात तुम्हाला वाचायचेच आहे तर कधी हे पण वाचुन बघा पुस्तके तर आज सगळेच वाचतात फरक एवढाच आहे कोणी आज आँनलाईन वाचते आहे तर कोणी आँफलाईन वाचते आहे पण वाचन तर सगळेच करतात. पण खरच तुम्हाला वाचायची मनापासुन आवड आहे ना तर अणि खरच तुम्हाला मनापासुन वाचायचेच आहे तर माणसांची डोळेही वाचुन बघा त्या डोळयांमध्ये लपलेले अश्रुही  कधी तरी वाचुन बघा त्या अश्रुंमध्ये दडलेला खरेपणा खोटेपणा वाचुन बघा. कधी तरी गोरगरिबांचे डोळेही वाचुन बघा त्या डोळयांमध्ये दडलेले अश्रु,दुखही वाचुन बघा त्या दुखामध्ये दडलेल्या त्यांच्या वेदना,तळमळ, कळकळ वाचुन बघा भुकेलेल्यांच्या डोळयांमध्ये एकावेळचे अन्न मिळविण्यासाठी जी तळमळ असते कळकळ असते ना ती तळमळ ती कळकळ कधीतरी वाचुन बघा. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुला मुलींच्या डोळयातील एकटेपणाचे,अनाथ असण्याचे दुखही कधी वाचुन बघा. आईवडिलांच्या मायेसाठी,प्रेमासाठी त्या अनाथांचा जो जीव तळमळतो तडफडतो कधी तोही तर वाचुन बघा. शोषित,पीडीत,दलित,दीनदुबळयांचे डोळयातील दुखही कधी वाचुन बघा माणुस असुनही समाजाकडुन अमानवी वागणुक मिळालेल्या त्या दीन दलितांच्या डोळय...

होय मी एकलव्य होणार.

होय मी एकलव्य होणार    आज सर्व जगाला माहीत आहे की एकलव्य कोण होता अणि आज आदर्श शिष्य म्हणुन त्याला का ओळखले जाते. तरीपण आपण माझ्या लेखाची सुरुवात करण्याआधी त्याचा परिचय करुन घेऊ.एकलव्य हा एक आदीवासी जातीतील मुलगा होता.ज्याला धनुर्रविद्या शिकायची होती.म्हणुन तो गुरू द्दोणाचार्याकडे जातो अणि त्यांना विनंती करतो की मलाही धनुर्रविद्या शिकायची आहे.कृपया आपण मला तुमचा शिष्य बनवुन घ्यावे.पण गुरु द्रौणाचार्य एकलव्यला आपला शिष्य बनवुन घेण्यास नकार देतात.    पण एकलव्य हा हार मानत नाही तो जेव्हा द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यांना धनुर्रविद्या शिकवतात तेव्हा ती लपुन बघायचा अणि त्याचाच तो दुर जंगलात जाऊन सराव तो रोज करायचा.अणि असेच एकेदिवशी गुरू द्रोणाचार्य जंगलातुन आपल्या शिष्यांबरोबर जात होते.पण वाटेतच एक कुत्रा गुरू द्रोणाचार्याकडे बघुन सारखा भुंकत होता.तेवढयात कुठुन तरी दोन तीन बाण आले अणि त्या बाणांनी त्या कुत्र्याच तोंड जखडले गेले.अणि त्या कुत्र्याचे तोंड बंद झाले.अणि गुरू द्रोणाचार्य जेव्हा त्या कुत्र्याजवळ गेले अणि त्यांनी त्याच्या तोंडातील बाण काढले.तेव्हा त्यांना हे लक्षात...

जगावे तर लहानमुलासारखे जगावे

जगावे तर लहानमुलासारखे जगावे      जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही आयुष्य जगत असते.पण आपण जे आयुष्य जगतो ते खरच आयुष्य आहे का?आपण आयुष्य जगत असताना एकमेकांशी नाती जोडतो अणि त्याच नात्यात कधी अशी वेळही येते की आपण एकमेकांशी भांडतोही अणि मग त्याच भांडणाचा राग मनात धरुन आपण आपली जोडलेली नाती कायमची तोडुन टाकतो.अणि एकमेकांविषयी आयुष्यभर मनात राग धरुन बसतो की त्याने असे केले होते किंवा त्याने माझे मन दुखावले होते तो मला वाईट वाटेल असे बोलला होता तसेच वागला होता.अणि तोच डुख आपण मनात धरुन आयुष्यभर जगत असतो.मनावर एक ओझे घेऊन आपण जगत असतो.अणि मग भविष्यात आपण त्याच ओझ्याखाली जीवण जगत असतो की तो मला असा बोलला होता ती मला असे बोलली होती किंवा हा माझ्याशी असा वागला तो माझ्याशी तसा वागला.अणि त्याच ओझ्याखाली जगत असताना आपण निरनिराळया व्याधींनाही बळी पडतो जसे की उच्च रक्तदाब,मानसिक अस्थिरता अशा अनेक आजारांना आपण बळी पडत असतो.ते ही का गतकाळात आपल्यासोबत काहीतरी वाईट घडले होते किंवा कोणी वाईट वागले होते याचा राग मनात धरुन आपण आयुष्यभर जगत असतो.अणि त्याच ओझ्याखाली जगत असताना अति तणावामुळे ...

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका.              प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :          प्रा.वर्षा आहिरे हया माझ्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयातील भाषाविज्ञान हया विषयाच्या प्राध्यापिका होत्या.तसे पाहायला गेले तर प्राध्यापिका वर्षा आहिरे शेवाळे हया ग्रामीण भागात लहानाच्या मोठया झालेल्या.त्यामुळे त्यांचा आवडीचा विषय हा ग्रामीण साहित्य हा होता.कारण त्यांना ग्रामीण जीवणाचा अनुभव होता.म्हणुन त्यांची मनापासुन इच्छा होती की त्यांनी आम्हाला ग्रामीण साहित्य हा विषय शिकवावा.पण ग्रामीण साहित्य हा विषय प्राध्यापक केशव गावित यांच्याकडे दिला गेल्यामुळे त्या मला भाषाविज्ञान हा विषय शिकवायच्या.मला हा शब्द मी हयासाठी वापरला आहे कारण तेव्हा वर्गात मी एकटाच असायचो त्या मला एकटयालाच शिकवायच्या.पण प्राध्...

आपल्या विदयार्थ्यांच्या हितासाठी नेहमी तळमळीने, कळकळीने विचार करणारी एक आदर्श शिक्षिका प्राध्यापिका.विदया सुर्वे बोरसे

आपल्या विदयार्थ्यांच्या हितासाठी नेहमी तळमळीने, कळकळीने विचार करणारी एक आदर्श शिक्षिका प्रा.विदया सुर्वे बोरसे     माझ्या महाविद्यालयीन जीवनात आत्तापर्यंतच्या माझ्या शैक्षणिक जडणघडणीत खुप लोकांचा मोलाचा वाटा आहे.ज्यात महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा,प्राध्यापिकांचा समावेश होतो. त्याच प्राध्यापकांपैकी,प्राध्यापिकांपैकी दोन प्राध्यापिकांचा उल्लेख मी नेहमी आवर्जून करत असतो.एक प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे अणि दुसर्‍या प्राध्यापिका स्नेहल मराठे.      माझ्या महाविद्यालयीन शैक्षणिक जडणघडणीत सर्वात प्रथम पहिला अणि मोलाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे ज्या बालसाहित्य समीक्षक आहेत.तसेच प्राध्यापिका स्नेहल मराठे यांचा आहे ज्या मराठी भाषेच्या,भाषाविज्ञानाच्या अभ्यासक आहेत.सध्या त्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणुन कार्यरत नाही आहे. कारण त्यांची दुसर्‍या महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे.प्राध्यापिका विदया सुर्वे  बोरसे हया मला बीए च्या दुसर्‍या वर्षात मराठी s1 हया विषयाच्या प्राध्याप...

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?    प्रसार माध्यमे याची व्याख्या काय?प्रसारमाध्यमे म्हणजे काय?प्रसारमाध्यमे कशाला म्हणतात?हे समजुन घेण्यासाठी आपल्याला खुप काही माहिती मिळवण्याची किंवा त्याविषयी वाचन करण्याची अजिबात आवश्यकता नाही.कारण प्रसारमाध्यमे हया नावातच त्याची व्याख्या अणि त्याचा अर्थ दडलेला आपणास दिसुन येतो.फक्त थोडया चिकित्सक दृष्टीने त्याकडे पाहण्याची आपल्याला आवश्यकता आहे.     ते असे की प्रसार म्हणजे पसरविणे असा त्याचा अर्थ होतो.अणि माध्यम म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला माध्यम म्हणतात.जसे की मी रोज लिहितो अणि माझ्या लिहिलेल्या लेखांमधुन मी तुम्हा सर्वांसमोर व्यक्त होत असतो.माझ्या भावना,विचार,माझ्या मनातील राग,वेदना,तळमळ इत्यादी सर्व काही मी माझ्या शब्दांमधुन तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करत असतो.म्हणजेच लिहिणे हे माझे व्यक्त होण्याचे माध्यम आहे.त्यादवारे मी तुम्हा सर्वांसमोर माझे विचार,भावना,तगमग,तळमळ,वेदना मी मांडत असतो.म्हणजेच लिहिणे हे माझे तुम्हा सर्वासमोर व्यक्त होण्याचे माझे माध्यम आहे असे आपणास या सर्वातुन स्पष्टपणे दिसुन येते.   ...

आपल्या मनातील दडलेल्या भावनांना व्यक्त होण्यासाठी वाट मोकळी करून देणे फार गरजेचे आहे.

आपण आपल्या दडलेल्या भावनांना व्यक्त होण्यासाठी वाट मोकळी करून देणे फार गरजेचे आहे.       मला एकदा माझ्या एका मित्राने विचारले की तु इतके छान लेख लिहितो एक चांगला लेखक तुझ्यामध्ये दडलेला आहे.स्वभावाने पण तु खुप समजुतदार आहेस अणि कधी कोणाशी भांडत पण नाही किंवा कोणामध्ये जास्त मिसळत पण नाही.आपल्या कामाशी काम ठेवणारा व्यक्ती तू जास्तीत जास्त अभ्यासातच स्वताचा वेळ घालवतो पण मला तुझी एक गोष्ट कळत नाही तु तुझ्या मनातील सर्व भावना राग,आनंद,प्रेम तु तुझ्या व्हाँटस अप स्टेटसला तसेच आपल्या व्हाँटस अँप गटावर बिनधास्त टाकतो तुला समोरच्या व्यक्तीला तुझे स्टेटस पाहुन वाईट वाटेल हे कळत नाही का अणि तुला जर हे कळत तर मग तु जाणूनबुजून असे का करतो?     माझ्या मित्राप्रमाणे खूप जणांना माझ्या विषयी हा प्रश्न निर्माण होत असेल की हा असे का करतो? पण ज्यांच्या मनात माझ्याविषयी हा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा होत असेल त्यांना मी एकच सांगु इच्छितो की मनातील राग मनात दाबुन ठेवल्याने माणुस मनातच दुखी होत राहतो.आणि स्वताला त्रास करून घेत असतो. अणि मनातील राग मनात दाबुन ठेवल्याने खुप मोठी मान...