होय मी एकलव्य होणार.
होय मी एकलव्य होणार
आज सर्व जगाला माहीत आहे की एकलव्य कोण होता अणि आज आदर्श शिष्य म्हणुन त्याला का ओळखले जाते.
तरीपण आपण माझ्या लेखाची सुरुवात करण्याआधी त्याचा परिचय करुन घेऊ.एकलव्य हा एक आदीवासी जातीतील मुलगा होता.ज्याला धनुर्रविद्या शिकायची होती.म्हणुन तो गुरू द्दोणाचार्याकडे जातो अणि त्यांना विनंती करतो की मलाही धनुर्रविद्या शिकायची आहे.कृपया आपण मला तुमचा शिष्य बनवुन घ्यावे.पण गुरु द्रौणाचार्य एकलव्यला आपला शिष्य बनवुन घेण्यास नकार देतात.
पण एकलव्य हा हार मानत नाही तो जेव्हा द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यांना धनुर्रविद्या शिकवतात तेव्हा ती लपुन बघायचा अणि त्याचाच तो दुर जंगलात जाऊन सराव तो रोज करायचा.अणि असेच एकेदिवशी गुरू द्रोणाचार्य जंगलातुन आपल्या शिष्यांबरोबर जात होते.पण वाटेतच एक कुत्रा गुरू द्रोणाचार्याकडे बघुन सारखा भुंकत होता.तेवढयात कुठुन तरी दोन तीन बाण आले अणि त्या बाणांनी त्या कुत्र्याच तोंड जखडले गेले.अणि त्या कुत्र्याचे तोंड बंद झाले.अणि गुरू द्रोणाचार्य जेव्हा त्या कुत्र्याजवळ गेले अणि त्यांनी त्याच्या तोंडातील बाण काढले.तेव्हा त्यांना हे लक्षात आले की त्या कुत्र्याला थोडीही इजा झालेली नव्हती किंवा त्याचे तोंडातुन थोडेही रक्त सुदधा निघाले नव्हते.तेव्हा गुरू द्रोणाचार्यांना फार आश्चचर्य वाटले अणि त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला की हे बाण मारले कुणी?शोध घेता घेता त्यांना एक युवक येताना दिसला.अणि तो युवक द्रोणाचार्यांच्या जवळ आला अणि त्याने द्रोणाचार्यांना साष्टांग नमस्कार केला.द्रोणाचार्य त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागले अणि त्याला म्हणाले कोण तु इथे कुठुन आलास?अणि तु हे बाण चालवलेस का?त्यावर तो युवक नम्रपणे म्हणाला गुरुजी माझे नाव एकलव्य हया जंगलातच आमचे भिल्लांचे राज्य आहे.माझे वडील हिरण्यधनु हया भिल्लांच्या राज्याचे राजे त्यांचा मी मुलगा.लहानपणी माझे बाबा मला तुमच्याकडे घेऊन आले होते.कारण मी त्यांच्यामागे हटट धरला की मला धनुष्यबाण शिकायचा आहे.मला धनुर्विदया शिकायची आहे पण आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्याकडे वेळ नसल्यामुळे तुम्ही मला शिकवायला नकार दिला.त्यावेळी मी खुप निराश झालो.पण नंतर मी ठरवले शिकणार तर तुमच्याचकडे.मग मी काय केले जंगलात परत आल्यानंतर तुमची एक मातीची मुर्ती तयार केली.ती एका झाडाखाली ठेवली अणि त्या मुर्तीच्या साक्षीने मी धनुर्विदया शिकायला सुरुवात केली.अणि माझे काही चुकले तर मी त्या मुर्तीलाच सांगत असे अणि गंमत म्हणजे मला पडलेल्या प्रश्नावर त्या मुर्तीकडुन मला उत्तरही मिळत असे.खुप प्रयत्न केल्यानंतर खुप सराव केल्यानंतर मला धनुर्विदया जमु लागली.मी सराव चालुच ठेवला अणि एकवेळ अशी आली मला तुमच्या आशिर्वादाने उत्तम धनुर्विदया जमु लागली.हे सगळे ऐकुण द्रोणाचार्यांचा अणि त्यांच्या इतर शिष्यांचा विश्वासच बसला नाही.मग द्रोणाचार्यांनी त्याची परिक्षा घेण्यासाठी म्हणतात.
हे बघ तु म्हणतो आहेस की तु सोडलेल्या बाणांमुळे हया कुत्र्याचे तोंड जखडले गेले पण हे आम्ही प्रत्यक्ष स्वताच्या डोळयांनी कुठे बघितले आहे त्यामुळे तु असे काहीतरी करुन दाखव की आम्हाला सगळयांना विश्वास पटेल की तु एक उत्तम धनुर्धारी आहेस.पण एकलव्याने द्रोणाचार्यांच्या आज्ञेनुसार आपला धनुष्यबाण काढला अणि तो अशा रीतीने सोडला की तो बाण आजुबाजुच्या फुलांना गोवत नेऊन गुरू द्रोणाचार्यांच्या मुर्तीच्या पायाशी जाऊन पडला.हे पाहिल्यानंतर गुरु द्रोणाचार्यांना धन्य वाटले अणि ते त्यांच्या सर्व शिष्यांना म्हणाले मुलांनो हा खरा शिष्य हा खरा विदयार्थी.नुसती गुरुची प्रतिमा डोळयासमोर ठेवुन त्याने आपल्या श्रदधेने,निष्ठेने अणि सरावाने शिक्षणात किती उच्च पातळी गाठली आहे बघा.इतकी निष्ठा,श्रदधा इतका सराव जर कराल तर कुठल्याही विदयेत तुम्ही पारंगत होऊन जाल.तेव्हा मुलांनो याच्यातुन तुम्हाला सर्वांना लक्षात आले का आपण कुठलीही गोष्ट केली.आपण अभ्यास करत असुखेळत असु किंवा एखादी कला जोपासत असु आपण त्या विषयामध्ये श्रदधा,निष्ठा अणि सराव याची जर जोड दिली तर तुम्ही एकलव्यासारखे तुमच्या विषयातही खुप पारंगत होऊन जाल.
अशी होती एकलव्याची गोष्ट.अणि आज माझ्यावर सुदधा आज एकलव्य होण्याचीच वेळ आली आहे कारण माझ्या सर्व गुरूंनी आज माझ्या डोक्यावरचा त्यांचा मायेचा हात काढुन घेतला आहे.पण मी खचुन जाणार नाही.मी एकलव्याप्रमाणेच माझ्या सर्व प्राध्यापकांची,गुरूजणांची प्रतिमा डोळयासमोर ठेवुन रोज निष्ठेने,श्रदधेने एकटा खुप अभ्यास करेन.अणि खुप ज्ञान प्राप्त करुन दाखवेन.अणि मी ही एकलव्य होऊन दाखवेल.माझ्या सर्व प्राध्यापकांचा एकलव्य.ते ही विना एम ए मराठीच्या गटावर येता.कारण आता जर मी एम ए मराठीच्या गटावर जर आलो तर मी माझा स्वताचा आत्मसम्मानही गमावुन बसेल.कारण इतके दिवस एम ए मराठीच्या गटावर मी खुप लापटासारखा जगलो आहे,वागलो आहे,राहिलो आहे.कोणी माझ्याशी नीट मनमोकळेपणाने बोलायचेही नाही तरी मी लापटासारखा सगळयांना संदेश पाठवायचो व त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो मग ते प्राध्यापिका वर्षा आहिरे असो या प्राध्यापिका सपणा सोनवणे असो किंवा इतर कोणतेही प्राध्यापक असो सगळे माझ्याशी आत्तापर्यत तुटकच वागले आहे.त्यामुळे आता मीच सगळयांपासुन दुर होण्याचा आता निर्णय घेतला आहे.
अणि आता मला पण बघायचे आहे.माझ्यासारखा विदयार्थी तुम्हाला पुन्हा भेटतो का?काही मुलामुलींचे ऐकुण
तुम्ही सर्व प्राध्यापकांनी माझ्याविषयी स्वताची जी मने आज दुषित करुन ठेवली आहेत ना.ती अशीच असू द्या.माझी काहीच हरकत नाहीये.आज तुमच्या हदयात माझी जी जागा होती ती काही मुलामुलींनी माझ्याविषयी तुमचे कान भरल्यामुळे तुम्ही माझ्यापासुन आज जी हिरावुन घेतली आहे ना ती अशीच असू द्या.अणि ज्यांचे ऐकुण तुम्ही सर्व प्राध्यापकांनी माझ्याविषयी स्वताची आज मने दुषित केली आहेत ना त्यांना सांगा मी एम ए मराठीचा गटच नाही तर म.स.गा महाविदयालय पण सोडले आहे.मी आता एम ए मराठीच्या कोणत्याच आँनलाईन किंवा आँफलाईन तासिकेला राहणार नाही.अणि वर्ष वाया जाऊ नये म्हणुन फक्त शेवटची परिक्षा देण्यासाठी महाविदयालयात येईल.त्याव्यतीरीक्त महाविदयालयात मी कधी माझा पायही ठेवणार नाही.हा शब्द आहे माझा.म्हणुन ज्यांना माझी जागा वर्गात घ्यायची होती अणि त्यासाठी ते सर्व प्राध्यापकांचे माझ्याविषयी वेळोवेळी कान पण भरत होते.आता ते बिनधास्त माझी जागा घेऊ शकतात.अणि सगळयांनी हयासाठीच सर्व प्राध्यापकांचे माझ्याविषयी कान भरले आहे की त्यांना सर्व प्राध्यापकांच्या मनात माझ्याजागी स्थान मिळावे.त्यासाठीच तर काही मुलामुलींनी माझ्याविषयी प्राध्यापकांचे कान भरले अणि त्यांचा हेतु सफल पण झाला आहे.
पण मी ही खचुन जाणार नाही.काय झाले जर माझ्या गुरूजणांनी माझ्या डोक्यावरचा त्यांचा हात आज काढुन घेतला आहे.काय झाले जर मी आज एकटा पडलो आहे.मी ही एकलव्यासारखा खुप श्रदधेने,निष्ठेने खुप मन लावुन अभ्यास करणार.ते ही आपल्या गुरुजनांच्या कोणत्याही मार्गदर्शनाविना.फक्त त्यांची प्रतिमा डोळयासमोर ठेवुन.त्यांनी माझ्यामध्ये आत्तापर्यत जी ज्ञानाची बीजे रोवली आहेत त्याच्या आधारावर.अणि मी ही माझ्या गुरूजणांचा
एक आदर्श विदयार्थी होऊन दाखवणार जसा एकलव्य द्रोणाचार्यांचा आदर्श विदयार्थी होता एकदम तसाच.
होय मी एकलव्य होणार.