शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.
शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.
शालेय जीवनात असो किंवा महाविद्यालयीन जीवनात असो प्रत्येक विद्यार्थ्याला असे वाटते की आमचे शिक्षक आमच्यावर विनाकारण रागावतात आमच्यावर चिडतात आम्हाला शिक्षा करतात.पण ते जे असे करत असतात त्याच्या मागे सुदधा काही कारण असते. फक्त आपल्याला तेव्हा ते कारण समजत नसते.पण आपण जसे जसे मोठे होत जातो तेव्हा आपल्याला कळते की आपले शिक्षक आपल्यावर का रागवायचे आपल्याला अभ्यास न केल्यावर का छडया द्यायचे.
आपले शिक्षक जे काही करतात त्यामागे आपले हितच दडलेले असते.त्यांचे आपल्यावर रागावणे शिक्षा करणे इत्यादी सर्व गोष्टींच्या मागे आपले हितच दडलेले असते.फक्त आपल्याला ते समजायला हवे हे सर्व सांगण्यासाठी असाच माझ्या आयुष्यात घडलेला एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगु इच्छितो मी डिप्लोमा इन कंप्युटर टेक्नॉलॉजी मध्ये शिकत असताना आम्हाला एक प्राध्यापक होते त्यांचे नाव तुषार शर्मा होते जे खूप मोठे संगणक अभियंता होते.ते आम्हाला कंप्युटर नेटवर्क हा विषय शिकवायचे.त्यांचे वैशिष्ट्य असे होते की ते ज्या विद्यार्थ्यांला प्रश्नांची उत्तरे यायची अणि ते उत्तर दयायला चटकन उभे राहायचे ते त्यांच्याकडे वळुनही बघायचे नाही अणि जो विद्यार्थी उत्तर दयायला तयार नाही राहायचा घाबरायचा ते त्यालाच पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायचे.
एकदा काय झाले नेहमीप्रमाणे प्राध्यापक तुषार शर्मा हे आम्हाला शिकविण्यासाठी तासिकेला वर्गात आले अणि त्यांनी शिकविण्यास सुरूवात केली.आणि एखादा मुद्दा शिकवुन झाला का त्याच्यावर लगेच प्रश्न विचारण्याची त्यांना सवय होती.कारण याच्याने विद्यार्थ्यांना शिकविलेला मुद्दा किती समजला आहे हे पण कळण्यास सोपे जाते.अणि त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना घेतलेली मेहनत पण वाया नाही जायची.एकदा असेच रोजप्रमाणे एक धडा शिकवून झाल्यानंतर त्यातील किती विद्यार्थ्यांना शिकवलेला भाग किती समजला आहे याची पडताळणी करण्यासाठी प्राध्यापक शर्मा यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
प्राध्यापक तुषार शर्मा यांनी एकएक करुन सगळयांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि प्रश्न विचारता विचारता ते माझ्या पर्यंत आले.अणि त्यांनी प्रश्न विचारण्यासाठी माझ्याकडे बघणार म्हणून मी माझी नजर खाली करुन बसलो.कारण एवढया मुलामुलींमध्ये उत्तर देण्यास मला भीती वाटत होती. कारण माझ्या मनात एक भीती होती की जर माझे उत्तर चुकले तर माझे वर्गात सगळ्यांसमोर हसु होईल सर्व मुले मुली मला हसतील अणि वर्गात माझी सगळयांच्या नजरेत मठठ मुलगा आहे मला काहीच येत नाही अशी ओळख निर्माण होईल.म्हणुन मी मला प्राध्यापकांनी प्रश्न विचारु नये म्हणून त्यांच्यापासुन नजर चोरत होतो.प्राध्यापक तुषार शर्मा यांना कळून चुकले की हा घाबरट आहे आणि सगळ्यांसमोर उत्तर दयायला घाबरतो आहे.
मग माझा घाबरटपणा दुर करुन माझ्यातील आत्मविश्वास अणि धाडस वाढावे म्हणून त्यादिवसापासुन प्राध्यापक तुषार शर्मा हे हे पुर्ण माझ्यामागेच लागले ते रोज एक दोन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की पुन्हा प्रश्न विचारायला माझ्याजवळच यायचे.असे एकदा नाही तर रोजच घडु लागले.मला मनात खुप राग यायचा की हे प्राध्यापक घडीघडी मलाच का प्रश्न विचारतात वर्गात एवढे विद्यार्थी आहेत प्रश्न विचारायला मग ते माझ्या एकटया मागेच का लागुन जातात.मनात कधी कधी रागाच्या भरात शिव्या पण यायच्या कारण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांच्यामुळे माझ हसु व्हायच.कारण काही प्रश्नांची उत्तरे मला अजिबात यायची नाही.मग एकेदिवशी रोजच्या त्रासाला कंटाळून मी प्राध्यापक तुषार शर्मा यांना सर्व विद्यार्थ्यांसमोर खुप बोललो की तुम्ही उठसूठ मलाच प्रश्न विचारतात,माझ्या मागेच लागुन जातात बाकीच्या विद्यार्थ्यांना पण प्रश्न विचारत जा ना फक्त एकटे मलाच का प्रश्न विचारतात.
यानंतर मला वाटु लागले की आता इथुनपुढे प्राध्यापक मला प्रश्न विचारणारच नाहीत.पण तो माझा निव्वळ गैरसमज होता.दुसरया दिवशी शिकवून झाल्यानंतर पुन्हा प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि ह्यावेळी त्यांनी मी तक्रार करु नये की तुम्ही मला एकट्यालाच प्रश्न विचारतात म्हणून त्यांनी पहिल्या बाकापासुन शेवटच्या बाकापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि फिरून फारून ते पुन्हा माझ्याकडेच आले.अणि पुन्हा माझी फसगत झाली मग मी तेव्हापासून त्या प्राध्यापकांच्या तासिकेला जायचेच नाही असे ठरवुन टाकले.अणि त्यानंतर मी एकदाही त्यांच्या तासिकेला बसलो नाही.
मग डिप्लोमा इन कंप्युटर टेक्नॉलॉजी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मी अभियांत्रिकी सोडुन म. स. गा महाविद्यालयात पुन्हा बीए ला प्रवेश घेतला.अणि तेथील परिस्थिती अशी होती की एकही विद्यार्थी नियमित तासिकेला यायचा नाही कोणी आठवडयातुन एकदा तासिकेला यायच तर कोणी महिन्यातून एकदा तासिकेला यायचे.त्यामुळे मी एकटाच वर्गात तासिकेला असायचो.मग प्राध्यापक मलाच एकटयाला शिकवायचे अणि मलाच प्रश्न विचारायचे.अणि मी ही आनंदाने निःसंकोचपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दयायचो कारण डिप्लोमा इन कंप्युटर टेक्नॉलॉजी मध्ये शिकत असताना प्राध्यापक तुषार शर्मा यांनी मला वर्गात पुन्हा पुन्हा उभे करून प्रश्न विचारून विचारुन चांगलेच प्रशिक्षित करुन टाकले होते. त्यामुळे त्याचाच फायदा मला म. स. गा महाविद्यालयात शिकत असताना झाला.कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मी बेडरपणे देत होतो.
अणि काही कालावधीनंतर मला लक्षात आले की हे सर्व प्राध्यापक तुषार शर्मा यांनी मला जे वर्गात पुन्हा पुन्हा उभे करुन प्रश्न विचारायचे त्यामुळे झाले आहे. माझ्या नकळतपणे त्यांनी माझ्या अंगी आत्मविश्वास,निडरपणा अणि स्टेज डेअरिंग निर्माण केली होती. मी भविष्यात इतर विद्यार्थ्यांच्या सारखाच निडर,आत्मविश्वासी अणि खंबीर बनावा म्हणून त्यांनी माझ्यासोबत असे वर्तन केले होते.अणि मी वेडा त्यांनाच मनोमनी कोसायचो शिव्या द्यायचो.त्यांच्याशी उदधटपणे बोलायचो.
हया गोष्टीतून मला एक गोष्ट चांगली लक्षात आली की जगातील कोणताच शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांचे वाईट व्हावे असे चितत नसतो.ते आपल्याला जी शिक्षा करतात रागावतात त्यामागे सुदधा आपलेच हित दडलेले असते. फक्त आपल्याला तेव्हा ते कळत नसते कारण आपण ते समजून घेण्याच्या मानसिकतेत नसतो.पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्याला कळते की त्यांनी जे केले ते योग्यच होते.
एका शिक्षकाच्या रागावण्यात पण त्याचे आपल्या विद्यार्थ्यांप्रतीचे प्रेमच दडलेले असते.
लेखक : योगेश सोनवणे
(लेखक एम.ए मराठीच्या प्रथम वर्षात शिकत आहे.)
महत्त्वाची टीप :लेखकाच्या नावासहित लेख इतरत्र पाठविण्यास कोणतीच हरकत नाही)