जगावे तर लहानमुलासारखे जगावे

जगावे तर लहानमुलासारखे जगावे

     जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही आयुष्य जगत असते.पण आपण जे आयुष्य जगतो ते खरच आयुष्य आहे का?आपण आयुष्य जगत असताना एकमेकांशी नाती जोडतो अणि त्याच नात्यात कधी अशी वेळही येते की आपण एकमेकांशी भांडतोही अणि मग त्याच भांडणाचा राग मनात धरुन आपण आपली जोडलेली नाती कायमची तोडुन टाकतो.अणि एकमेकांविषयी आयुष्यभर मनात राग धरुन बसतो की त्याने असे केले होते किंवा त्याने माझे मन दुखावले होते तो मला वाईट वाटेल असे बोलला होता तसेच वागला होता.अणि तोच डुख आपण मनात धरुन आयुष्यभर जगत असतो.मनावर एक ओझे घेऊन आपण जगत असतो.अणि मग भविष्यात आपण त्याच ओझ्याखाली जीवण जगत असतो की तो मला असा बोलला होता ती मला असे बोलली होती किंवा हा माझ्याशी असा वागला तो माझ्याशी तसा वागला.अणि त्याच ओझ्याखाली जगत असताना आपण निरनिराळया व्याधींनाही बळी पडतो जसे की उच्च रक्तदाब,मानसिक अस्थिरता अशा अनेक आजारांना आपण बळी पडत असतो.ते ही का गतकाळात आपल्यासोबत काहीतरी वाईट घडले होते किंवा कोणी वाईट वागले होते याचा राग मनात धरुन आपण आयुष्यभर जगत असतो.अणि त्याच ओझ्याखाली जगत असताना अति तणावामुळे आपण हया अशा दुर्धर आजारांना सामोरे जात असतो.ते ही का गतकाळात आपल्यासोबत जे घडले ते मनाला लावुन बसल्यामुळे,त्याचाच सतत विचार करत बसल्यामुळे आपण अशा आजारांना भविष्यात बळी पडत असतो.
   पण मी म्हणतो मला मिळालेले आयुष्य हे किती दिवसांचे आहे हे मला माहीत नाही अणि तुम्हाला मिळालेले आयुष्य हे किती दिवसांचे आहे हे तुम्हालाही माहीत नाही.मग आपण आपल्याला मिळालेले आपले एवढे अनमोल मुल्यवान आयुष्य एकमेकांविषयी मनात राग धरुन व्यर्थ का घालवायचे?.कारण आज मिळालेले आयुष्य आपल्याला पुन्हा कधी मिळेल हे पण आपल्याला माहीत नाही पुन्हा मिळेलच याची काही गँरंटी पण नाही.मग कशाला एवढे सुंदर आयुष्य एकमेकांविषयी मनात राग धरुन,द्वेष बाळगुन आपण वाया घालवायचे.तुम्हाला माझ्याविषयी काय वाटते?हे तुमचे वैयक्तिक विचार आहेत वैयक्तिक भावना आहेत पण मी तरी जास्त वेळ कोणाविषयी मनात राग ठेवुन राहत नाही.कारण मला स्वतामध्ये दिवसेंदिवस नवनवीन बदल घडवुन आणायला आवडतात.नवनवीन गोष्टी शिकायला तसेच करायला आवडते.म्हणुन मी एकाच गोष्टीत कधीच अडुन बसत नाही म्हणुन मी आपल्या गटावर कधी कोणाशी भांडणही झाले तर तो राग व्यक्त करुन लगेच मोकळा होतो अणि दुसरया दिवशी पुन्हा आनंदाने जगायला,राहायला लागुन जातो.मी माझ्या मनावर कोणतेच ओझे ठेवत नाही.काही लोकांना माझ्याविषयी असेही वाटत असेल की योगेश हा थोडा वेडा आहे.पण मी म्हणतो असा वेडापणा करुन जगण्यातच खरी जगण्याची मज्जा आहे.कारण एकदा झालेल्या भांडणाचा,गैरसमजाचा राग मनात धरुन आयुष्यभर कुढत बसण्यापेक्षा ज्या व्यक्तीसोबत काल परवा आपले वादविवाद,मतभेद झाले भांडण झाले ज्याच्याविषयी आपल्या मनात समज-गैरसमज निर्माण झाले.त्यांच्याशी झालेले ते भांडण वादविवाद गैरसमज विसरुन दुसरया दिवसापासुन पुन्हा त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलुन,वागुन आयुष्य जगण्यास तरी काय हरकत आहे?याच्याने आपल्या मनावर कोणत्याही प्रकारचे जुने ओझे राहत नाही.अणि आपणही त्या ताणतणावातुन मोकळे होतो.अणि मग आपण आपल्या पुढच्या आयुष्यात कोणताही भुतकाळ डोक्यात घेऊन न जगता आनंदाने जगु शकतो.
   पण आपण तसे करतच नाही आपण एकाच गोष्टीविषयी मनात राग धरुन आयुष्यभर जगत असतो अणि याचेच परिणाम स्वरुप आपल्याला भविष्यात अनेक शारीरीक,मानसिक आजारांना बळी पडावे लागते.कारण आपण आयुष्यभर हाच विचार करत बसतो की त्याने माझा अपमान केला माझे मन दुखावले वगैरे वगैरे.
   तसे पाहायला गेले तर माझा पण आपल्या एम ए मराठीच्या गटावर खूप जणांनी अपमान केला आहे.विदयार्थी काय प्राध्यापकांने सुदधा माझा अपमान केला आहे.पण मी कोणाचेच नाव घेणार नाही.कारण जरी त्यांनी नकळत का होईना माझा अपमान केला तरी काय फरक पडतो कितीही केले गुरू आहे ते माझे अणि त्यांचा अधिकार आहे माझ्यावर,उदया मी काहीही चुकुन वागलो तर ते हक्काने माझ्या दोन थोबाडीत ठेवु शकतात.माझे कान ओढुन मला जाब विचारू शकतात.
एवढा अधिकार आहे त्यांचा माझ्यावर.
   पण मला एकच गोष्ट खटकली ती म्हणजे एम ए मराठीच्या गटावर दोन लेखकांमध्ये केला जाणारा भेदभाव.कारण मागील काही दिवसात जेव्हा माझे लेख मी एम ए मराठीच्या गटावर टाकायचो तेव्हा एकदाही प्राध्यापक किंवा विदयार्थी यांनी माझ्या लेखावर यांनी कमेंट केली नाही.किंवा लाईक केले नाही.पण अचानक प्राध्यापक विनोद गोरवाडकर त्यांचे लेख  एम ए मराठीच्या गटावर टाकायचे तेव्हा लगेच मराठी विभागप्रमुख अरुण पाटील त्यांच्या प्रत्येक लेखावर कमेंट करायचे.अणि हे मी विश्वासाने सांगु शकतो की मराठी विभागप्रमुख अरुण पाटील हे जाणुनबुजुन करायचे.कारण माझी निरीक्षण शक्ती खुप चांगली आहे त्यामुळे अशा जाणुनबुजून केलेल्या भेदभावाच्या गोष्टी माझ्या चटकन लक्षात येतात अणि हे एकदा नाही तर खुपवेळा झाले आहे पण मी दुर्लक्ष करत गेलो.उलट मी माझ्या स्वताच्या मनाला समजावुन सांगायचो जाऊ दे तुच कुठेतरी लिहिण्यात कमी पडला असशील म्हणुन तुझे लिहिलेले लेख कोणाला आवडत नसेल पुढच्यावेळी अजुन चांगला लिहु.पण रोज तसेच होत होते प्राध्यापकाच काय तर विदयार्थी पण तेच करत होते.कल्याणी बोरसे नावाची एक मुलगी मी माझे लेख टाकल्यावर अजिबात प्रतिसाद दयायची नाही.पण त्याच मी माझ्या प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांचे लेख टाकायचो तर लगेच कमेंट करायची.एवढेच काय मी अधुन मधुन काही फाँरवर्ड लेख ग्रुपवर टाकायचो तर तेही ती लगेच लाईक करायची अणि असे रोज होताना मला दिसत होते.मग मला कळुन चुकले मी कुठेच कमी पडत नाहीये लोक मला जाणुनबुजुन मी कमी असल्याची मला जाणीव करुन देता आहे.अणि मला मी कमी असल्याची जाणीव देणारे दुसरे कोणी नाही तर माझेच गुरूजण आहेत तसेच वर्गसहकारी आहेत ज्यांना मी नेहमी मदत करत आलो आहे.अणि मी त्यांना केव्हा अणि कधी मदत केली हे मी बोलुन दाखवणार नाही.कारण पुर्ण वर्गाला माहीत आहे मी त्यांना किती मदत केली आहे.
     माझे लेख कोणी लाईक केले नाही किंवा त्यावर कमेंट नाही केली याचे मला अजिबात दुख नाहीये.अणि मी साहित्यिक विनोद गोरवाडकर किंवा लेखिका विदया सुर्वे बोरसे यांची बरोबरीही करु इच्छित नाही.कारण ते माझ्यापेक्षा वयाने अणि अनुभवानीही खुप मोठे आहे.अणि मी कधी त्यांची बरोबरी करणार पण नाही.अणि मला करायचीही नाही.अणि ते दोघे माझेच गुरू आहेत मला त्यांच्याविषयी अजिबात राग नाहीये किंवा मी त्यांच्याशी स्वताची स्पर्धाही करणार नाही.अणि ते दोघेही माझ्यापेक्षा क्षेष्ठच आहेत.पण मला जाणुनबुजुन तुम्ही सगळयांनी जी हिनतेची वागणुक दिली ती माझ्या मनाला खूप लागली.त्यादिवशीच मला कळून गेले की सर्व विदयार्थ्यांना मी फक्त एक जोकर वाटतो जो रोज त्यांचे गटावर नवननीन गोष्टी करुन मनोरंजन करतो त्यांना हवे ते शैक्षणिक साहित्य पुरवतो बाकी एम ए मराठीच्या विद्यार्थ्यांना माझ्याशी काहीच देणघेण नाही.मी गट सोडुन निघुनही गेलो तर मला कोणाचा कधी फोनही येत नाही.की मी गट का सोडला का लेप्ट झालो?सकाळयांना वाटत आपले मतलब निघु राहिले ना आपल्याला आपले व्हिडिओ मिळाले ना आता तो खडडयात जावो असेही विदयार्थी माझ्याविषयी मागुन बोलतात हे पण मला माहीत आहे.
ते मला फक्त स्वताच्या मतलबासाठी विचारतात बाकी त्यांच्या नजरेत माझी लायकी शुन्य आहे.हे पण मला आता चांगले कळुन आले आहे.
     मी मराठी विभागप्रमुख अरुण पाटील यांना अजिबात दोष देत नाही कारण त्यांची अणि माझी खास ओळख नाही.किंवा एवढा परिचय नाही.म्हणुन ते मला नीट ओळखत नाही.पण तुम्ही मराठी विभागाचे विदयार्थी तर मला एक वर्षापासुन ओळखता ना मग तुम्ही माझ्यासोबत हा भेदभाव का केला?मी मान्य करतो ना मी मागील काही दिवसात तुमच्या सगळयांशी खुपच वाईट वागलो काही क्षण मी गर्वाच्या आहारी पण गेलो होतो हे मी स्वता मान्य करतो.अणि मी त्याबाबत प्राध्यापकांकडे माफी पण मागितली आहे.पण तरीही मी केलेल्या एका चुकीमुळे तुम्ही सगळयांनी मला कायमचे परके करुन टाकले.तुमच्यासाठी मी आज एक फक्त रोज तुम्हाला लेक्चरचे व्हिडिओ पुरवणारा हमाल आहे.जो रोज सकाळी एम ए गटावर येतो अणि रोज तुम्हाला व्हिडिओ पुरवतो जे तुम्ही लगेच सेव्ह पण करुन घेतात.
   अणि माझ्या मनात हे खुप दिवसांपासून हे दडलेले होते जे मला आज मोकळे  करायचेच होत ते मी आज तुमच्या सर्वांसमोर केल आहे.अणि हयानंतर आता मी कधीच एम ए मराठीच्या गटावर माझे लेख टाकणार नाही.भलेही मला कितीही ईच्छा झाली तरी.असे काही नाही माझे लेख कोणी वाचत नाही किंवा मला लिहायला जागा नाही.मी आज चार ते पाच वेबसाईटवर माझे लेख टाकतो आहे माझे लेख रोज सर्व वेबसाईटवर मिळुन रोज कमीत कमी २०० ते ३०० लोक रोज वाचतात.तसेच मी माझे लेख काही व्हाँटस अँपच्या लेखकांच्या ग्रुपवर पण रोज टाकतो तिथेही रोज सर्व ग्रुप मिळुन कमीत कमी हजार लोक माझे लेख लोक रोज वाचतात.अणि मला त्यांचा भरपुर प्रतिसादही मिळतो अणि हे मी स्वताची मोठायकी करत नाहीये हे खरे आहे.अणि मला तुम्हाला एवढच सांगायच आहे की मला लिहायला आज जागा कुठेच कमी नाही आहेत पण मी एम ए मराठीच्या गटावर हयासाठी लिहित होतो.कारण हा माझा हक्काचा गट आहे.माझा स्वताचा गट आहे.पण हा गट आता माझा राहिला नाहीये.माझ्यासाठी परका झाला आहे.त्यामुळे इथुनपुढे माझे लेख येथे टाकणारही नाही.कारण आता माझे लेख मी एम ए मराठीच्या गटावर टाकले अणि तुम्ही ते लाईक पण केले तरी माझे मन मला मान्यता देणार नाही.कारण मी सांगितल्यानंतर माझे लेख कोणी लाईक केलेले मलाही आवडणार अणि मला ते रुचणार पण नाही.अणि कोणाकडूनही भीकेत मिळालेले कौतूक नको आहे मला.म्हणुन आता मीच माझे लेख एम ए मराठीच्या गटावर टाकणार नाही. 
       अशाप्रकारे वेळोवेळी प्रत्येकाने मला जाणुनबुजून हिनतेची,अपमानास्पद वागणुक दिली आहे 
फरक फक्त एवढाच आहे की कोणी माझा अपमान बोलुन केला तर कोणी माझा अपमान न बोलता सुदधा कृतीकरुनही केला.अणि मला त्याच गोष्टीचा खुप त्रासही झाला पण माझ्या डोक्यावर माझ्या महात्मा फुले सावित्री आईचा अणि बाबासाहेब आंबेडकरांचा हात आहे.म्हणुन मी कधीच कोणत्याच प्रसंगात खचुन जात नाही.अणि जरी मी खचायला लागलो तर तेव्हा मी माझ्या डोळयांसमोर महात्मा फुले,सावित्रीबाई फुले अणि माझे प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा डोळयासमोर आणतो.अणि जेव्हा मी हया तिघांची प्रतिमा माझ्या डोळयांसमोर आणतो तेव्हा मला इतके बळ भेटते की मी जगातील कितीही मोठयात मोठया संकटालाही एकटा सामोरे जावू शकतो.म्हणुन मी कितीही दुखी झालेलो असलो तरी काही क्षणाने पुन्हा हसायला लागतो.याला कारण हया तीन व्यक्तींचा माझ्या डोक्यावर असलेला कृपार्शिवादच आहे.
  अणि हे मी फुशारकी मारण्यासाठी कोणाला सांगत नाहीये.हे एकदम खरे आहे.कारण आज मी गोरगरिबांच्या दुखाशी जे समाविष्ठ होऊ शकतो त्यांच्या वेदना वाचु शकतो त्यांच्या डोळयातील दुख वाचु शकतो,त्यांच्या डोळयातील अश्रु मी स्वताच्या डोळयातुन काढु शकतो.याला कारण माझी सावित्री आई माझे महात्मा फुले अणि माझे आद्य प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकरच आहेत.ज्यांचा चेहरा डोळयासमोर ठेवुन मी गोरगरिबांच्या वेदना,दुख अनुभवु शकतो,त्यांच्या डोळयातील अश्रु वाचु शकतो,त्यांच्याविषयी तळमळीने,कळकळीने लिहु शकतो.त्यांच्या हक्कासाठी भांडुही शकतो.इतका मी माझी सावित्री आई महात्मा फुले अणि बाबासाहेब आंबेडकर यांचा चेहरा डोळयासमोर ठेवुन गोरगरिबांच्या दुखाशी समरस होऊ शकतो.त्यांचे प्रश्न मांडु शकतो व त्याचसाठी कोणाशीही वैचारिक वादविवादही करु शकतो.अणि आज जी ही ताकद माझ्यात निर्माण झाली आहे की मी कोणत्याही विषयावर माझे मत चारचौघात न घाबरता परखडपणे मांडु शकतो.याला कारण हे दोन व्यक्ती महात्मा फुले अणि बाबासाहेब आंबेडकर आहेत.अणि माझी सावित्री माऊली आहे.आज हयाच तीन जणांचा आदर्श डोळयासमोर ठेवुन मी आज रोज जगतो आहे.
    असो मी माझ्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळतो.मला ऐवढेच सांगायचे आहे की एक लहान मुल हे जसे कोणाविषयीच आपल्या मनात जास्त वेळ राग ठेवत नाही.काही वेळानंतर ते ज्याच्याशी भांडण झाले त्याच्याशीही पुन्हा बोलायला लागते.त्याच्यामध्येच खेळायला लागते.ते ही मनात कोणताही राग किंवा द्वेष न ठेवता एकदम अशाच पदधतीने आपल्यालाही जगता आले पाहिजे.चिंतामुक्त अणि तणावमुक्त.कारण आपण मनात राग पाळुन आपलेच शारीरीक तसेच मानसिक नुकसान करुन घेत असतो.
   म्हणुन आपल्याला तणावमुक्त किंवा चिंतामुक्त जीवण जगण्यासाठी लहानमुलाप्रमाणे काल झालेले जुने भांडण विसरुन नव्याने हसत खेळत जगता आले पाहिजे.
    म्हणुन आपण प्रत्येकाने जगावे तर एकदम लहान मुलासारखे जगावे.

Popular posts from this blog

प्रसारमाध्यमे म्हणजे काय?

आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी,अणि नेहमी त्यादृष्टीनेच विचार करणारी तसेच आमचे मौन सुदधा वाचणारी एक अत्यंत शांत,संयमी स्वभावाची,शिस्तप्रिय,तत्वनिष्ठ,अणि आम्हा सर्व विदयार्थ्यांवर आईप्रमाणे माया करणारी एक मायाळु शिक्षिका. प्रा.वर्षा आहिरे शेवाळे :

शिक्षकांच्या रागावण्यात पण त्यांचे प्रेम दडलेले असते.