आपल्या विदयार्थ्यांच्या हितासाठी नेहमी तळमळीने, कळकळीने विचार करणारी एक आदर्श शिक्षिका प्राध्यापिका.विदया सुर्वे बोरसे
आपल्या विदयार्थ्यांच्या हितासाठी नेहमी तळमळीने, कळकळीने विचार करणारी एक आदर्श शिक्षिका
प्रा.विदया सुर्वे बोरसे
माझ्या महाविद्यालयीन जीवनात आत्तापर्यंतच्या माझ्या शैक्षणिक जडणघडणीत खुप लोकांचा मोलाचा वाटा आहे.ज्यात महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा,प्राध्यापिकांचा समावेश होतो. त्याच प्राध्यापकांपैकी,प्राध्यापिकांपैकी दोन प्राध्यापिकांचा उल्लेख मी नेहमी आवर्जून करत असतो.एक प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे अणि दुसर्या प्राध्यापिका स्नेहल मराठे.
माझ्या महाविद्यालयीन शैक्षणिक जडणघडणीत सर्वात प्रथम पहिला अणि मोलाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे ज्या बालसाहित्य समीक्षक आहेत.तसेच प्राध्यापिका स्नेहल मराठे यांचा आहे ज्या मराठी भाषेच्या,भाषाविज्ञानाच्या अभ्यासक आहेत.सध्या त्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणुन कार्यरत नाही आहे. कारण त्यांची दुसर्या महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे.प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे हया मला बीए च्या दुसर्या वर्षात मराठी s1 हया विषयाच्या प्राध्यापिका होत्या.ज्यात त्या मला साहित्य विचार हा विषय शिकवायच्या. तर प्राध्यापिका स्नेहल मराठे हया मला बीए च्या दुसर्या वर्षात व्यावहारिक अणि उपयोजित मराठी तर बीए च्या तिसर्या वर्षात वर्णनात्मक भाषाविज्ञान हया विषयाच्या प्राध्यापिका होत्या. हया दोघांचा म. स. गा महाविद्यालयातील माझ्या शैक्षणिक जडणघडणीत फार मोलाचा वाटा आहे.
आज मी आपणास आमच्या प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांच्याविषयी काही सांगु इच्छितो.प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांनी माझ्या मनात साहित्याविषयी आवड निर्माण केली.माझ्या मनात साहित्य वाचन अणि साहित्यनिर्मितीची गोडी निर्माण केली.अणि साहित्य वाचणाबरोबरच मला साहित्य निर्मितीसही प्रवृत्त केले.मी पण लेखन करू शकतो अणि एक लेखक,साहित्यिक बनू शकतो ही भावना माझ्यामध्ये प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांनी निर्माण केली.त्यांनी कधीही माझा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.कधीही मला दुर्लक्षित केले नाही.
सर्वात पहिले जेव्हा मी लेखणास सुरूवात केली तेव्हा मी सुरूवातीला खुप अणि खुपच व्याकरणाच्या चुका करायचो काना, मात्रा,वेलांटी.स्वल्पविराम पुर्णविराम नवीन परिच्छेद न करता सलग लिहणे अशा अनेक व्याकरणिक खूप चुका मी करायचो पण प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांनी कधीच माझा आत्मविश्वास डगमगु दिला नाही.एक आई जशी आपल्या मुलाच्या चुकांवर पांघरूण घालते एकदम त्याचप्रमाणे त्या माझ्या चुकांवर पांघरूण घालायच्या.अणि मला लेखणासाठी जास्तीत जास्त प्रेरित करायच्या.त्या मला हेच सांगायच्या की आधी तु तुझ्या मनातील सर्व भावना, विचार एका कागदावर जसेच्या तसे लिहुन टाक मग नंतर त्यातील कोणता भाग ठेवायचा अणि कोणता भाग काढुन टाकायचा हे ठरवत जा.
एकदा महाविद्यालयात शिकत असताना ग्रंथालयातील ग्रंथ हे नियमित महाविद्यालयात येणार्या विद्यार्थ्यांना न मिळता जे विद्यार्थी कधी महाविद्यालयात पायही ठेवत नाही त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जातात आणि नियमित महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरेसे ग्रंथ हे प्राप्त होत नाही हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला अणि तसा वैयक्तिक अनुभवही मला प्राप्त झाला अणि मला वाटु लागले की माझा नियमित महाविद्यालयात येऊन तरी काय फायदा जर नियमित महाविद्यालयात येऊनही मला महाविद्यालयीन सुविधांचा लाभ प्राप्त प्राप्त होत नाही.मी महाविद्यालयात रोज नियमितपणे येऊनही मला सर्व विषयांचे ग्रंथ हे उपलब्ध करून दिले जात नाही.अणि जे विद्यार्थी कधी महाविद्यालयात पायही ठेवत नाही त्यांना पुस्तके ही वेळेवर उपलब्ध करून दिली जातात.अणि मी ग्रंथालयात पुस्तकांविषयी तपास करायला गेलो तर मला सांगितले जाते की पुस्तकांचा साठा हा संपला आहे हा आम्हा नियमितपणे महाविद्यालयात येणार्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे याची जाणीव मला झाली अणि याचाच निषेध म्हणून मी महाविद्यालयात जाणेच बंद करून दिले.
सलग दोन ते तीन दिवस मी महाविद्यालयात गेलोच नाही.प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांना मी वर्गात सलग दोन ते तीन दिवस दिसलोच नाही.प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांना माझी काळजी वाटू लागली की एकही दिवस महाविद्यालयात गैरहजर न राहणारा माझा विद्यार्थी हा सलग दोन ते तीन दिवसांपासून महाविद्यालयात दिसुन येत नाहीये.कोणत्याच विषयाच्या तासिकेलाही तो येत नाहीये.तो ठिक तर असेल ना तो आजारी वगैरे तर पडला नसेल ना असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.अणि त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नावाच्या रजिस्टर मध्ये असणार्या संपर्क क्रमांकांमधुन माझा नंबर शोधून मला माझ्या मोबाईलवर माझी विचारपूस करण्यासाठी फोन केला. पण त्याक्षणी मी इतका रागात होतो की मी त्यांना सरळ ब्लाँकच करून टाकल.मग सलग एक हप्त्यानंतर माझा राग थोडा शांत झाला.
अणि मी एकेदिवशी महाविद्यालयात गेलो माझ्याकडे पाहूनच प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांनी समजून घेतले की नक्कीच याचे काहीतरी बिनसले आहे.मग त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मला काहीही न बोलता सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरूवात केली.अणि तासिका संपल्यानंतर मला बाजुला बोलवून त्यांनी विचारपूस केली की काय झाल बाळ इतके दिवस कुठे होतास?महाविदयालयात का येत नव्हता?काही झाल आहे का?तुझी तब्येत बरी नाहीये का? सर्व काही ठीक आहे ना? इतके दिवस तुझा फोन पण लागत नव्हता.असे विविध प्रश्न विचारण्यास त्यांनी सुरूवात केली.मग मला काही राहावले नाही मी माझ्या मनातील सर्व राग बाहेर ओकुन टाकला.यावर प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे मला काहीच बोलल्या नाहीत.
पण दुसर्या दिवशी त्या थेट प्राचार्यांना जाऊन भेटल्या अणि माझ्या सर्व समस्या त्यांनी प्राचार्य सी.एन.निकम यांच्यासमोर मांडल्या. पण प्राचार्यांकडुन काही योग्य ते आश्वासन न मिळाल्यामुळे दुसर्या दिवशी नियमितपणे तासिका संपल्यानंतर प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे माझ्याजवळ आल्या अणि मला म्हणाल्या बाळ योगेश ज्या बाबतीत आपण काही करू शकत नाही त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते.तुला जे पुस्तक हवे असेल ते मला सांग मी तुला आणुन देईल अणि हवे असल्यास तु वैयक्तिक ग्रंथालयात जात जा हवे असेल तर तुझी ग्रंथालयाची फी मी भरते असे आश्वासन त्यांनी मला दिले.हया घटनेतून मला प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे यांच्या मनात असलेली विद्यार्थ्यांविषयीची त्यांच्या शिक्षणाविषयीची तळमळ अणि कळकळ दिसुन आली. आपल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांचा आर्थिक भारही उचलण्याची त्यांची तयारी होती.फक्त माझा विद्यार्थी शिकायला हवा अणि त्याच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये खंड पडू नये त्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात हाच त्यांचा मुख्य हेतु हे सर्व करण्यामागचा होता.
त्याचबरोबर आणखी एक असा प्रसंग आहे की ज्यामुळे मी त्यांचा फार मनापासुन आदर करतो. एकदा महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात मी एस. वाय. बीए ला असताना प्राध्यापकांच्या वेतनवाढीविषयी काहीतरी वाद निर्माण झाला होता याचेच परिणाम स्वरूप सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे बंद केले अणि ते संपावर गेले.अणि त्याच्या एक दोन महिन्यानंतरच आमची परिक्षा होणार होती पण प्राध्यापकांच्या वेतनवाढीचा प्रश्न निर्माण झाला अणि तत्काळ सर्व प्राध्यापक संपावर गेले. कोणतेच प्राध्यापक वर्गावर शिकविण्यासाठी येत नव्हते.अणि त्यात आमच्या परिक्षा तोंडावर आल्या होत्या अणि अभ्यासक्रमही खुप बाकी होता.त्यात वर्गात मी एकटा असल्यामुळे मला शिकवायला येण्यासाठी कोणीच तयार नव्हते.
सर्व मराठी विभागातील प्राध्यापक हे संपावर बसले होते पण प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे हया त्या संपात सहभागी झाल्या नाही.त्यांचे असे म्हणने होते की मला माझ्या वेतनवाढीविषयी कोणतीच समस्या नाहीये अणि विनाकारण शिकवणे बंद करून मी माझ्या विद्यार्थ्यांचे नुकसान का करू?माझे वेतन वाढले नाही तरी चालेल पण मी माझ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही मी संपावर जाऊन माझ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही अशा मतावर त्या ठाम होत्या.
अणि त्या नेहमी म्हणायच्या की शंभर विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा माझ्या फक्त एका विद्यार्थ्यांलाही मी व्यवस्थित शिकवले अणि त्याचे कल्याण झाले भविष्यात तो मोठया हुद्यावर गेला तरी माझ्यासाठी खूप आहे. माझे शिकवणे सार्थकी लागले असे मी समजेल.
अशा होत्या आमच्या प्राध्यापिका विदया सुर्वे बोरसे ज्या नेहमी आपल्या विद्यार्थ्यांंला प्रथम प्राधान्य द्यायच्या त्यांच्या अभ्यासाला, शिक्षणाला प्रथम महत्व द्यायच्या अणि त्यानंतर बाकी सर्व गोष्टी.
आपल्या विदयार्थ्यांच्या हितासाठी नेहमी तळमळीने,कळकळीने विचार करणारी एक आदर्श शिक्षिका.